.post img {

Automatic Size

Showing posts with label Film Review. Show all posts
Showing posts with label Film Review. Show all posts

Sunday, 25 February 2018

गुलाबजाम (2018) - समीक्षण

चित्रपट (पदार्थ)- गुलाबजाम
दिग्दर्शक  (chef) - सचिन कुंडलकर
कथा, पटकथा (भाजी)- सचिन कुंडलकर, तेजस मोडक
अभिनय - सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर आणि वेगवेगळे पदार्थ
छायाचित्रण - मिलिंद जोग
वेळ - 120 मिनिटात तयार
Rating -- खूपच चवदार (5/5)




समीक्षण--
अतिशय चविष्ट सिनेमा अशी कमेंट दिली तरी वावगी ठरणार नाही. मराठी सिनेमामध्ये स्वयंपाकावर आधारित असलेला पहिलाच प्रयोग असेल. पण या चित्रपटाचा आचारी आहे दिग्दर्शक. भाजी पटकथा, संवादाची आहे, छायाचित्रण म्हणजे ती भाजी वाढण्याची कला आहे पण सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर याचे मीठ आणि मसाला आहेत. बरोबर ना? मीठ आणि मसाल्याशिवाय जेवणाची कल्पना करा, म्हणजे मला त्यांच्या कामाविषयी वेगळं सांगायची गरज भासणार नाही.

सचिन कुंडलकरांनी या चित्रपटमार्फत आपल्याला सुंदर अशी गुरू शिष्य परंपरा, एक मैत्री/प्रेम याच्याही पलीकडे असू शकणारं नातं याचा एक अनुभव दिलाय.

कथा तशी साधी सोपीच आहे. लंडनमध्ये मोठ्या बँकेमध्ये गलेलठ्ठ पगारावर काम करणाऱ्या आदित्यला (सिद्धार्थ चांदेकर) मराठी पदार्थाचं रेस्टॉरंट सुरू करायची उपरती सुचते. आधीच स्वयंपाकाची आवड असलेला पण घरच्यांनी 'हे काम करायला तू काय बाई आहेस का' असे आपल्याकडे शिक्कामोर्तब असलेलं वाक्य म्हणत शिकू न दिलेला आदित्य. एकदा भारतात आल्यावर, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तो गुपचूप पुण्यात येऊन राहतो. त्याला शोधायचा असतो, मराठी पदार्थ शिकण्यासाठी गुरू. पण घरच्यांसाठी तो लंडन मध्येच असतो. मित्राच्या रूमवर आलेल्या डब्यातला गुलाबजाम खाल्ल्यावर त्याचं मन भावून जातं. स्वयंपाक शिकेन तर हा डबा बनवणाऱ्या स्त्रीकडूनच शिकेन, अशी प्रतिज्ञाच घेतो. तिथेच त्याला भेटते ती अतिशय तापट आणि माणसांचा तिटकारा असणारी राधा. खूप 'पापड बेलल्यानंतर' त्याला ती शिष्य म्हणून स्वीकारते. इथपर्यंत फक्त चित्रपटाची फोडणी पडलेली आहे, खरा चित्रपट मसालेदार आणि चवदार होतो इथून पुढं चित्रपट आदित्य आणि राधाच्या गुरुशिष्याच्या आणि एका अनामिक गूढ नात्याच्या जवळ जवळ जातो.

राधाच्या मते, स्वयंपाक म्हणजे जुळवाजुळव किंवा टाईमपास नाही तर ते एका आर्टिस्टच्या कुंचल्यातून सादर झालेलं चित्र किंवा एका कवीच्या लेखणीतून आलेल्या कवितेइतकीच  सुंदर कला आहे. स्वयंपाक करणाऱ्याने स्वतःला त्यात ओतून घेतलेलं असतं.

राधाच्या विक्षिप्त स्वभावाचं कारण, हळूहळू प्रेक्षकांसमोर येतं. तिच्या जीवनातील आठवणी जाग्या होताना आपल्याही मनाची घालमेल होते. सोनाली ने साकारलेली राधा पाहताना वाटतं हीच राधा आहे. तिच्यातला तिरसट पणा, घराबाहेर पडताना थोडा घाबरलेपणा, कधी थोडी बालीश या सर्व छटा खूप उच्चकोटीच्या अभिनयाने सादर केल्या आहेत. दिग्दर्शकाने character development अतिशय सचोटीने handle केलंय. राधाची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या सुरुवातीला कारल्यासारखी कडू असली तरी चित्रपट संपेपर्यंत गुलाबजाम सारखी गोड झालेली असते. व्यक्तिरेखेचा प्रवास इतका उत्तमरीत्या मांडलेला खूपच मोजक्या चित्रपटामध्ये असेल. सिद्धार्थने केलेला आदित्यही उत्तम जमलाय.

चित्रपटाचं तिसरं character म्हणजे पदार्थ. दोन तास आपल्यासमोर छान छान पदार्थ बनताना दिसतात. रसरशीत फोडणी, मस्त पुरणपोळी, भातावर घट्ट घट्ट वरण आणि तूप, ताजे उकडीचे मोदक, आणि पाकामध्ये पूर्ण बुडलेला गुलाबजाम तोंडाला पाण्याची धारच लावतात. जसा चित्रपटामध्ये संगीत दिग्दर्शक असतात तसे यात food दिग्दर्शक आहेत सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट.  या दोघीनी चित्रपटाचा फूड section छानरीत्या सांभाळून,  आत्मा शांत ठेवलेला आहे. आणि त्यांना साथ आहे, छायाचित्रणाची. जे खूप वेगवेगळ्या angle ने पदार्थांची सैर घडवते.

या निमित्ताने आपल्या कुटुंबव्यवस्थेतला ऐरणीवरचा प्रश्न समोर येतो. आपल्या मुलांना आपल्या घरी स्वयंपाक शिकवायला आईवडिलांना का कमीपणा वाटतो. आपल्याकडे स्वयंपाक म्हणजे कला म्हणून नाही तर काम म्हणून पाहिलं जातं. आणि ते विशेषतः मुलींच्या गळ्यातच टाकलं जातं. जेवण म्हणजे आयुष्याचा अतूट भाग आहे. मग मुलगा असो वा मुलगी दोघांनाही ते शिकवायला हवं व यायलाच हवं.

एक मजेची गोष्ट म्हणजे youtube हा पण आता स्वयंपाक शिकण्याचा गुरू बनतोय. सगळ्या recipies available आहेत. पण चित्रपट हे दाखवून देतो की एखाद्याच्या सहवासात जितका छान स्वयंपाक शिकाल तेवढं इंटरनेटवर नाही शिकू शकणार. आणि राधाच्या मते, भाजी आणण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळं करत नाही तोपर्यंत खरा स्वयंपाक आला असं म्हणता येणार नाही.

खूप दिवसातून एक छान मराठी सिनेमा आलाय, नक्की  खा.... sorry नक्की पहा.. गुलाबजाम...

वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास तुमची कमेंट जरूर द्या आणि शेअर करा. पदार्थ दुसर्यांना वाटल्यास अजून गोडी वाढते.



Monday, 2 October 2017

सैराट (२०१६)... उत्तुंग वाटचाल गावाच्या मातीची...

हा रिव्ह्यू नाहीये.. हे आहे कौतुकएका मराठी रसिकाकडूनएका सैराट धावणाऱ्या सिने-कलाकृतीचे. आजकाल चित्रपटाचे यशहे कमावलेल्या बिझनेस मध्ये मोजले जाते. खूप सुंदर सुंदर चित्रपट तयार होऊन सुद्धा मराठी चित्रपटांचे यश बॉक्स ऑफिस च्या कमाई मध्ये होत नव्हते. कारण एक तर मराठी प्रेक्षक वर्ग मर्यादित आणि जर प्रायोगिक सिनेमा असेल तर होणारी गर्दी कमी. सैराट ने 50 करोड चा आकडा पार केला आणि मराठी सिनेमा ला नवी स्वप्ने पडू लागली आहेत. मराठी पाऊल असेच सैराट धावू लागेल यात शंकाच नाही.


  
तर आता सैराट कडे वळू. हा सिनेमा म्हणजे पाण्यामध्ये मारलेला दगड आहे. पाणी शहरातले असो वा गावातले तो दगड मारल्यावर मनामध्ये मस्त वलय उमटतात. ते वलय तुम्हाला हसवणाररडवणार आणि मस्ती देखील करणार. या सिनेमा ची स्टोरी जर तुम्ही एखाद्याकडून ऐकलीत तर तुम्ही म्हणाल "बसइतकंच आहे या पिच्चर मध्येएवढी का हवा झालीय याचीशाळा किंवा कॉलेज मधील लव्ह स्टोरी तर आता खूप पिच्चर मध्ये असते." पण एकदा तुम्ही "सैराट" पाहून आला कि बाहेर येईपर्यंत मन हसतेगुणगुणतेप्रेमात बुडते आणि सुन्न देखील होते. 

सैराट चे दिग्दर्शककथा आणि डायलॉग लिहिणारे आजचे सनसनाटी व्यक्तिमत्व नागराज मंजुळे हे सिनेमा वठवण्याचा खूप कठीण प्रयत्न करत नाहीत. तर ते त्या कलाकरांमधून अलगद नैसर्गिक अभिनय करून घेतात. त्यात कुठेही नाटकीपणा नसतोअवाढव्य सेट नसतोग्लॅमर नसते. असतो तो चटपटीत संवादनैसर्गिक अभिनयभन्नाट संगीत आणि मनाचा ठाव घेणारी कथा. आणि विशेष म्हणजे ते स्वतः एखादी लहान मोठी भूमिका करून एन्जॉय करतात.

सैराट चे हिरो हिरोईन,  रिंकू राजगुरू (आर्ची) आणि आकाश ठोसर (परशा) हे दोघेही नवखे असून पण मोठ्या रोम्यांटिक कलाकारांना जमणार नाही अशी केमिस्ट्री सादर केलीय. सिनेमा संपेपर्यंत अवखळ स्वभावातून त्यांच्यात येणारी maturity खूप सहज बदलत जाते. परशाच्या मित्रांची भूमिका एकदम झक्कास. पोराच्या "लव्ह सेटिंग" ची काळजी त्याच्यापेक्षा मित्राना जास्त असतेआणि त्यांचे प्रयत्न आपल्याला पोट धरून हसायला लावतात. मंजुळे नी या चित्रपटा मध्ये सहकालाकारांची कास्ट बर्यापैकी "फॅन्ड्री" मधूनच घेतली आहे आणि ते सर्व कलाकार दिग्दर्शकाच्या विश्वासाला न्याय देतात.

अजय-अतुल बद्दल काय बोलायचेहे दोघे मराठी संगीताला लाभलेले लखलखीत सूर आहेत. सैराट ची गाणी कधी मनाला नाचायला लावताततर कधी शांत डोलायला लावतात. गावरान शब्दात सांगायचे तर "याड" लावतात.

ह्या चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलायचे तरहा खूपच संवेदनशील मुद्दा आहे. भलेही आज सर्वानी हा सिनेमा पाहून परशा आणि आर्ची ची वाहवा केलीय आणि शेवटी जे घडते त्याबद्दल दुःख व्यक्त केले असेल. पण खऱ्या आयुष्यात अशा लव्ह म्यॅरेज केलेल्या मुला मुलींना किती वाईट नजरेने पाहीले जाते. त्यांचे लग्न म्हणजे घराची इज्जत चा प्रश्न मानला जातो. मग त्यांची शोधाशोध केली जाते. सापडले तर ताटातूट केली जातेमारहाण केली जाते. जर त्यांनी कायद्याचा आधार घेतला तर वाळीत टाकले जाते. त्या दोन कुटुंबामध्ये सुद्धा भांडणे होतात. दुसरा दृष्टिकोन असा आहेमुलांच्या बाबतीत जर पाहिले तर खूप वेळा ते प्रेम म्हणण्यापेक्षावयात येताना असलेलं फक्त आकर्षण असतं. समजून पण न उमजणारं कोडं असतं. आयुष्यात काहीतरी बनून दाखवण्याआधी संसाराचा गाडा ओढावा लागतो मग जे प्रेम आधी मजा होते तेच बंधन वाटायला लागले. याला अपवाद असतीलनाही असे नाही. पण खूप थोडे.

तुम्ही म्हणाल कि एवढा एन्जॉय करायच्या सिनेमावर एवढी गंभीर चर्चा कशाला. पण मन सुन्न करणाऱ्या क्लायमॅक्स मधून नागराज मंजुळेंना समाजाला विचार करायला लावायचाय. आणि तो तुम्ही नक्की करा. मंजुळेंच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स नेहमी वर्मी घाव आणि जखमेतून ही विचार देऊन जातो.

If a reader doesn't understand Marathi, Even then I Request U to watch "Sairat". It has English subtitles and Many Bollywood personalities have appreciated this movie.

टीप: हा लेख "सैराट" या मराठी चित्रपटावर आधारित असूनयावरील मते वैयक्तिक लेखकाची आहेत. वाचकास एखाद्या मुद्द्यावर हरकत असल्यास कृपया कमेंट मध्ये आपले मत मांडावे. धन्यवाद..!!



"नटसम्राट (२०१६)" - असा नट होणे नाही...

चित्रपट संपला तरी थियेटर सुन्न झालेले असते.... प्रेक्षक खुर्ची ला खिळून बसलेले असतात ... नावे पडत असतानाच नानांच्या आवाजात शेवटचा  संवाद  चालू असतो.... डोळ्यांच्या कडा एका अभूतपूर्व अभिनयाच्या साक्षात्काराने ओलावलेल्या असतात... जेव्हा नावे संपून पडदा पूर्ण मोकळा होतो त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मगच प्रेक्षक जागेवरून उठतात. नटसम्राट आपल्या हृदयामध्ये घेऊनच बाहेर पडतात.
 माझ्या मते चित्रपटगृहात असा नजारा... असा आदर... निर्माण करणे,आजपर्यंत खूपच थोड्या चित्रपटानी साध्य केलेय.  हाच खरा चित्रपटज्या मध्ये किती कमाई केली यापेक्षा किती मनाचा ठाव घेतला या मध्ये याचे यश मोजले जाईल.. "नटसम्राट" ने मराठीच नव्हेतर देशाच्या चित्रपट सृष्टीचा गौरव केला आहे.

प्रथमसाष्टांग नमस्कार कुसुमाग्रजांना (मूळ नाटकाचे लेखक)डॉ. श्रीराम लागू ना (मूळ नाटकाचे नटसम्राट)ज्यांनी गणपतराव आपल्यापुढे जिवंत केले. नव्या पिढीला ते नाटक जवळून पाहण्याचे भाग्य लाभले नाही. पण महेश मांजरेकर (दिग्दर्शक) आणि नाना पाटेकर (मुख्य भूमिका) यांनी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर उभारण्याचे उपकार केले. नाटक आणि सिनेमा यांत तुलना होऊच शकत नाही आणि ती करण्याचा कुणी प्रयत्न हि करू नये. कारण दोन्ही माध्यम आपल्या ठिकाणी सम्राट आहेत.

चित्रपटाची कथाप्रसिध्द नट गणपतराव बेलवलकर (नाना पाटेकर)पत्नी कावेरी (मेधा मांजरेकर),  त्यांची मुले आणि गणपतरावांचा जिवलग मित्र राम (विक्रम गोखले) यांच्या आयुष्याभोवती फिरते. आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर "नटसम्राट" हि मानाची पदवी मिळाल्या नंतर गणपतराव निवृत्ती घेतात.आयुष्यभर रंगभूमीच्या सागरात मनसोक्त डुंबनारा हा राजहंसनिवृत्तीनंतर खऱ्या व्यवहारी जगात येतो. पण त्यांची खऱ्या आयुष्यातील निस्वार्थीस्पष्टविनोदी व वेळप्रसंगी तिरके बोलणारी बालिश भूमिका त्यांच्या मुलांना खालच्या दर्जाची वाटू लागते. त्यांना भक्कम साथ असते ती म्हणजे त्यांची पत्नी "कावेरी" ची. कलाकार हा जणू पणती असते व त्याचा जोडीदार हा त्या पणती ची मिणमिणती ज्योत असते. ती स्वतः जळत असते पण त्या पणतीला व घराला प्रकाशमान करत असते. पण दुर्दैवानेसगळा मान पणती ला मिळतो व ज्योत विझल्यावरच तिच्या अस्तित्वाची जाणीव होते व कमी भासते. काही दिवसातच गणपतराव व कावेरी अगदी घरालाही पारखे होतातकावेरी बाईंचा मृत्यू होतो व आप्पासाहेब एकटे पडतात.

नाना पाटेकर यांच्या विषयी काय बोलावे? 'प्रहार', 'यशवंत', 'तिरंगा', 'क्रांतिवीरयातले त्यांचे डायलॉग अजून आमच्या तोंडपाठ आहेत. नाना हेच खऱ्या अर्थाने अप्पासाहेब या भूमिकेसाठी योग्य अभिनेते आहेत. खऱ्या अर्थाने आमचे नटसम्राट आहेत. मेधाजी नी आपल्या पतीविषयी वाटणारे "कावेरी" चे प्रेम व काळजी जिवंत केली आहे. मेधा मांजरेकर ह्या मराठी चित्रपट सृष्टीला थोड्याश्या उशिरा लाभलेल्या अप्रतिम चरित्र अभिनेत्री आहेत.त्यांच्याकडून अश्याच दमदार भूमिका पाहायला मिळोत ही अपेक्षा.

माझ्यासारख्या खूप साऱ्या रसिकांची इच्छा असेलती म्हणजे नाना पाटेकर व विक्रम गोखले यांना एकत्र काम करताना पाहण्याची. ती इच्छा "नटसम्राट" ने पूर्ण करून दिली ती ही अगदी तृप्तपणे. राम "विक्रम गोखले" मृत्युशय्येवर असतानागणपतरावांशी जो कर्ण व कृष्णाचा संवादाचा नाटकाचा प्रवेश सादर करतात तो "अवर्णनीय". मृण्मयी देशपांडेनेहा पेंडसेसुनील बर्वे यांचा अभिनय हि लोभसवाणा आहे.

चित्रपट अतिशय उत्तम प्रकारे हाताळला आहे. नाटकाच्या स्क्रिप्ट मध्ये योग्य ते थोडेफार बदल केलेले आहेत. पण मूळ संवाद अतिशय ताकदीने सादर केले आहेत. जळालेल्या नाट्यगृहात जेव्हा वृध्द गणपतराव बेलवलकर प्रवेश करतात त्यावेळचा क्षणनानांचा अभिनय अद्वितीय आहे. कलाकार आपले आयुष्य व त्याचे सर्वस्व कलेसाठी आणि रसिकांसाठी वेचतो. अर्थात त्याबद्दल कलाकाराला प्रसिद्धीमान मरातब आणि पैसा हे मिळतेच. पण जेव्हा तो कलाकार निवृत्त होतो त्यावेळी त्याला समजून घ्यायला कुणी नसतेअगदी त्याचे कुटुंबीय सुद्धा त्याला समजू शकत नाहीत. 

या कथेमध्ये अजून एक भाग आहेतो म्हणजेजेव्हा निवृत्ती नंतर आई वडिलांचीमुलांकडून होणारी उपेक्षा. दोन पिढ्यातील अंतर वयामध्ये असतेपण जेव्हा मनातील अंतर वाढत जाते तेव्हा नाती रुक्ष होतात. आपण तरुण पिढी एक गोष्ट विसरतो, "म्हातारपण म्हणजे दुसरे लहान पण असते".. त्या स्थितीत पुन्हा नाती बदलतात व मुलांनाच आपल्या आई वडिलांचे पालन पोषण करावे लागते. अगदी लहान मुलांप्रमाणे हट्ट केला तरीही पुरवावा व स्वतःची काळजी घेत नसतील तर प्रेमापोटी रागवावे हिपण त्याचबरोबर रागावणे आणि उपेक्षा करणे यातील फरक जरूर ध्यानी ठेवावा.

रसिकांसाठी वर्षाची सुरुवात इतकी अप्रतिम व्हावी यासारखा आनंद नाही. "या तुफानाला घर जरूर मिळते पण ते रसिकांच्या मनात". 

सलाम सर्व अभिनेत्यांना आणि मराठी चित्रपट सृष्टीलाज्यांनी आजपर्यंत आम्हाला हसवलेरडवले आणि अभिनयाच्या भावनेमध्ये मंत्रमुग्ध केले.

टीप: या लेखामधील मत हे वैयक्तिक असून "नटसम्राट" या चित्रपटावर आधारित आहे. जर लेखामध्ये काही अनावधानाने चूक आढळल्यास जरूर सांगावी. नटसम्राट हे नाटक youtube वर पहायला मिळू शकते https://www.youtube.com/watch?v=Oim1yeSGshg
धन्यवाद.





कट्यार काळजात घुसली (२०१६)...अभूतपूर्व स्वरांची मैफिल...!!

"सूर निरागस हे ..."

 या पेशकशीने चित्रपटाची सुरुवात होते " आणि तेच स्वर गुणगुणत तुम्ही थिएटर मधून बाहेर पडता. काळजामध्ये सुरांची कट्यार घुसलेली असते आणि तुम्हाला ती अजून रुतत जावी असेच वाटते.

सुबोध भावे यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न. पण हा चित्रपटएखाद्या मुरलेल्या दिग्दर्शकाच्या भट्टीतून तयार झालेल्या कलाकृतीच्या तोडीचा वाटतो. हा चित्रपट म्हणजे आपल्या आधीच्या पिढीची अमूल्य ठेव पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा प्रयत्न आहे.

पुरुषोत्तम धार्वेकर लिखित 1967 मधील मूळ "कट्यार.." हे नाटकप. जितेंद्र अभिषेकी यांनी "पंडित भानुदास शास्त्री" यांच्या भूमिकेत आणि वसंतराव देशपांडे यांनी "खांसाहेब" यांच्या भूमिकेत गाजवले. तो ठेवाआजिबात मोडतोड न करता आणि एकदम ताजातवाना करून आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आपल्या पिढीला संगीत नाटक जवळून पाहता आले नाही. पण या चित्रपटामुळे ते अनुभवायला मिळाले त्याबद्दल "कट्यार.." च्या टीम चे आभार मानायला हवेत.


चित्रपटाची स्टोरी सांगणार नाही मी.. पण खालील वाक्य चित्रपटाचा पाया सांगून जाते...
"कलाकाराला दोन गोष्टींचा शाप असतो.. "तुलना" आणि "अहंकार".

पार्श्वगायन आणि संगीताचा अतुल्य पर्वत शंकर महादेवन जीराहुल देशपांडे आणि महेश काळे यांनी पेलला आहे. "घेई छंद..मकरंद" , "तेजोनिधी..", "दिल कि तपिश.." या गाण्यांमधील हरकती अंगावर रोमांच उभा करून जातात. तुमची नजर आणि कान धुंद होऊन जातात. सिनेमासाठी आवश्यक नव्या संगीतरचना करताना शंकर-एहसान-लॉय हे त्रिकुट जुन्या पदांना धक्का लावत नाही. पदांची रचना करण्यासह दोन भिन्न घराण्यांचं संगीत देणं हे प्रतिभाच करू शकते. हे यातून पुन्हा सिद्ध होतं. म्हणूनच सिनेमा पाहात असलो तरी इथेही संगीत हाच याचा आत्मा ठरतो. मराठी प्रेक्षकांमध्ये असे खूप कमी लोक आहेत की जे शास्त्रीय संगीत ऐकतात किंवा त्यातली जादू अनुभवतात. पण ह्या चित्रपटातील स्वरलोकांना नक्कीच शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पाडेल.

तसे पाहिले तर या गाण्याच्या तारांगणातअभिनयाचे एक अढळ सप्तर्षी बनवून ते आणखीनच सुंदर केले आहे. सचिनजी पिळगावकरशंकर महादेवन जीसुबोध भावेअमृता खानविलकरमृण्मयी देशपांडेपुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर हे सर्व कलाकार या चित्रपटाचे सप्तर्षी आहे. सर्व कलाकारांनी आपली पात्रे आपल्या जागेवर अढळ केली आहेत.

सचिनजींच्या 50 वर्षाच्या कार्यकाळातील एक मैलाचा दगड म्हणून "खांसाहेंब" हि भूमिका ओळखली जाईल. खरे तर त्यांचा चेहरा आणि स्वभाव एक अत्यंत निरागस आणि मृदू प्रकारचा. पण खांसाहेंब हि भूमिका अत्यंत करारीकडकअभिमानीराजगायक पदावर बसण्यासाठी काहीही करण्यासाठी निगेटिव्ह छटा असलेली आहे. पण आपल्या समोर त्या भूमिकेत निरागस सचिन. त्यांनी त्या भूमिकेसाठी स्वतः चे समर्पण करून एक खांसाहेबाना शोभेल असा एक नवाच नट उभा केला आहे. कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही कि हे सचिन पिळगावकर आहेत. सचिनजी नी एका मुलाखती मध्ये सांगितल्याप्रमाणेपन्नास वर्षात हा त्यांच्यासाठी असा पहिलाच मराठी चित्रपट आहेज्यामध्ये त्यांनी निगेटिव्ह छटा साकारली आहे आणि तेही एक हि मराठी शब्द न वापरता.


शंकर महादेवन यांनी सुरेल अभिनय करून आपल्या अभिनयाचा पहिलाच अंक यशस्वी केला आहे. सुबोध भावे हा कलाकार एक आगळ्या वेगळ्या भूमिकेसाठी भुकेलेला नायक आहे. या आधी बालगंधर्वलोकमान्य टिळक यासारख्या भूमिकांमधून आपले ऐतिहासिक महानायकरासिकांसाठी जिवंत केले आहेत. तीच अभिनयाची तीव्रता त्यांच्या "कट्यार...." च्या सदाशिव च्या भूमिकेत दिसते. अमृता खानविलकर आणि मृण्मयी देशपांडे या दोघी "झरीना" आणि "उमा" या पात्रात खूप सुंदर दिसतात. आणि हिंदी मालिकांमधील लाडकी सून साक्षी तन्वर या खांसाहेबांच्या बेगम ची भूमिका छोटी असली तरी एक लक्षात राहणारी साकारली आहे.

मूळ नाटकात खांसाहेंब आणि पंडित जी यांची भूमिका सादर करणारे श्रेष्ठ गायक स्वतः होते. पण चित्रपटामध्ये पार्शवगायन असल्यामुळे शास्त्रीय संगीत गायनाचा अभिनय करण्याचे एक खूप मोठं आव्हान होते. तो आवेश.. तो फंकार.. सुरानुसार बदलणारी डोळ्यातील चलबिचलया गोष्टी सचिन आणि सुबोध भावे यांनी अतिशय उत्कटतेने जगल्या आहेत. कुणीही म्हणणार नाही कि ते पार्श्वगायन केलेल्या पेशकशी आहेत.

माझ्या मते पूर्ण भारता मध्ये असा Musical चित्रपट आजपर्यंत झाला नाही आणि भविष्यात झालाच तर रसिक खूप भाग्यवान असतील.

तुम्हाला शास्त्रीय संगीत आवडत नसेल तरीही पाहायला जा आणि अनुभवा ते सूर. आणि जे सच्चे संगीतप्रेमी असतील तर एक एक पदं ऐकताना तुमचे डोळे ओलावले नाहीत तर तुमचे मन तिथे नव्हतंच असे समजा.

कट्यारीचे मनोगत ज्या अभिनेत्री च्या आवाजात आहे ते पण एक surprise आहे.

Note: If you are non-Marathi n just have scrolled down this article. Please note this movie has Subtitles. And greatest ever Music. So please watch "Katyar Kaljat Ghusli" "Dagger through Heart".

जर या लेखनात काही चुका असतील तर माफ करावे आणि कृपया दर्शवून द्याव्यात.




व्हेंटिलेटर.... नात्यांचा उपचार करणारा चित्रपट..

बऱ्याच दिवस या चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर पाहात होतो. प्रियांका चोप्रा हिची निर्मिती, खूप सारे कलाकार, आशुतोष गोवारीकर यांचं अभिनयातील पदार्पण, आणि बोमन इराणी यांचा छोटासा रोल या मुद्द्यांमुळे वाटत होतं की खूपच पॉलिशड् आणि मध्यम वर्गाच्या भावनांच्या पलीकडचा असावा.

व्हेंटिलेटर पाहिल्यावर लक्षात येते की हा खूपच आपलासा आहे. हास्य आणि भावनांची एकदम रसरशीत मिसळ आपल्याला चाखायला मिळते. हॉस्पिटल मध्ये कोणी व्हेंटिलेटर वर असणे म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या व्यक्तीला Life Support वर ठेवणे. ते काढल्यावर व्यक्तीची जगायची क्षमता अगदी नगण्य असते. कुटुंबावर मग धर्मसंकट आणणारा प्रश्न डॉक्टरांकडून विचारला जातो,  व्हेंटिलेटर काढून टाकायचा कि सुरु ठेवायचा. मिनिटा मिनिटाला हॉस्पिटल चे।हजारो रुपयांनी बिल वाढत असते आणि भावनेला सुद्धा किंमत लागत जाते. याच प्रश्नाभोवती फिरणारा हा चित्रपट.

हॉस्पिटल मध्ये आजारी कोण आहे, हे महत्वाचे नसते तर कोण कोण त्या रुग्णाला पाहायला आले हे महत्वाचे असते. असे म्हणतात की रुग्णाला आजारापेक्षा पाहायला येणाऱ्या नातेवाईकांचा जास्त त्रास असतो. या चित्रपटात हीच गोष्ट अगदी मिश्किल पद्धतीने दाखवण्यात कथाकार आणि दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत.

या चित्रपटात कलाकार जास्त असले तरी प्रत्येक पात्र तेवढंच महत्वाचं आणि वेगळेपण दाखवून जाणारे आहे. सर्व कलाकार असे आहेत की जे मराठी चित्रपट सृष्टीत दुय्यम फळीतील (सहाय्यक कलाकार) मानले जातात. जितेंद्र जोशी, आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी यांचे रोल्स आपण मध्यवर्ती म्हणू शकतो. आशुतोष गोवारीकर यांचे मराठी पदार्पण चांगलं झालं आहे पण आपण त्याला एकदमच अप्रतिम वगैरे नाही म्हणू शकत नाही.

चित्रपट पावणे तीन तास लांबीचा असला तरी तो वेळ तुम्हाला कधी संपलेला कळणार पण नाही. इथे लेखन आणि संवादासाठी पूर्ण क्रेडिट द्य्यावे लागेल. दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी तर कमालच केलीय. इतक्या सारया कलाकारांना हँडल करणे म्हणजे दिग्दर्शकालाच व्हेंटिलेटर वर जायची पाळी यायची. पण कलाकारांच्या म्हणण्या नुसार त्यांनी एवढ्या शांत डोक्याचा दिग्दर्शक कधीही पाहिला नाही (खुद्द आशुतोष गोवारीकर हेच म्हणाले). ब्रेकिंग न्यूज म्हणजे यातला प्रत्येक कलाकार ऑडिशन घेऊनच Casting  केली आहे. नंतर प्रोमोशन च्या वेळेस प्रत्येक कलाकाराने ऑडिशन घेतल्यावर आपल्याला किती राग आला होता व काम करताना ऑडिशन चे कळालेले महत्व मान्य केले आहे.

चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन हा संवाद, छायाचित्रण, अभिनय, दिग्दर्शन यांचा उच्चांक गाठतो. हा सीन पाहताना तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळून जातील. 

चित्रपटाचा गूढार्थ हा आहे की नात्यांना व्हेंटिलेटर वर जाईपर्यंत तानू नका. घरात मतभेद वाद यासारखे छोटे छोटे रोग होतच असतात, त्याला प्रेम आणि क्षमावृत्ती हे औषध वेळीच घ्यावे लागते. नाहीतर घर हे व्हेंटिलेटर वर जाते आणि काही लोक व्हेंटिलेटर न काढता आजार आपसूक बरे व्हायची वाट पाहतात किंवा काही लोक व्हेंटिलेटर काढून नातं मृत व्हायला परवानगी देतात.

प्रियांका चोप्रा सारखी सातासमुद्रापार अभिनय पोहोचवलेली अभिनेत्री मराठी चित्रपट निर्मिती करतेय हे पाहून मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रसिकांचा अभिमान वाटतो.


टीप: वरील लेख मराठी चित्रपट "व्हेंटिलेटर" यावर आधारित आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि आवडल्यास ब्लॉग "Follow" करा.

Wednesday, 19 October 2016

Hachi- The Dog's Tale (2009)

Last week, I came across one of the blog article written on this film called "Hachi: A Dog's Tale". Yeah, I also thought the same,  like you, that how unusual is film's name.after seeing the title of this article. But, after reading that blog, I was completely attracted by the subject of the film. Immediately, I downloaded and watched it.


Film: Hachi: A Dog's Tale
Rease Date: July 2009
Director: Lasse Hallström
Screenplay: Stephen P. Lindsey
Cast: Richard Gere, Joan Allen, Cary-Hiroyuki Tagawa 

This film tells the true story of friendship, trust, and affection of Japan's most faithful dog "Hachi". We have seen many of such films in Hollywood or any other Cinema. This film definitely stands out. The greatness of this film lies in the simplicity of a story with great execution. 

The story starts with a Japanese monk sending cute puppy of a special breed called 'Akita', through parcel to someone in the foreign country. Unfortunately, it fails to reach to intended person and gets abandoned on Bettridge Station. Apparently, the  music professor finds this little puppy on a station platform, while coming back to home, after work. Out of humanity, the professor makes a decision to keep the dog and to try and find his rightful owners with the help of his Japanese friend. But he fails to do so and keeps the dog to himself. As usual, he faces unwillingness of his wife to keep the puppy. Eventually, Hachi, with his adorable love, makes a deep bond with the professor and his family. Each morning, Hachi comes to escort professor to a railway station and come to pick up professor in evening. After years of this routine, Hachi becomes daily visiting persona to station making friendship with hot-dog seller and other shop owners on the way to Station.

But one day...

Professor gets a heart attack at work and he could not make it to home for forever. But Hachi never believes this. He waits at Railway Station each day for the professor. Which follows the heart-breaking story ahead. How many days Hachi waits for his master? I was intending to share the full story here, but I didn't want it to spoil. I request you to watch this Film once in life.

Tear some Scene of Film

I would give hats-off for the direction of the film. It must have been really hard to get dogs in a right mood for each scene. It is also a notable thing, that all the scenes from Hachi's view are monochromatic (considering dogs have monochromatic visual capacity). John Geller has portrayed his role as professor outstandingly. I had seen his only other Film i.e. "Pretty Woman" earlier. He always has a command on a role, which depicts characteristics of a decent gentleman. Joan Allen is also elegantly fit in professor's wife's role. 

Some words regarding Hero of the Film i.e. Hachiko ( The Dog). Real challenge of making the Film on this subject, is to show the dog in all the life stages (From Puppy days to the Aged days). For which director had to use three different dogs named Chico, Layla, and Forrest.

 
Hachi's Original Picture taken in Japan

First Film on this story had been made in the   Japanese language in 1987 (Hachiko monogatari). This was basically a true story based on Professor Ueno and Hachi.

On May 19, 2012, a bronze statue of Japanese dog Hachiko was unveiled at the train depot at Woonsocket Depot Square where "Hachi: A Dog's Tale" was filmed. This is an exact replica of the bronze statue of Hachiko which resides in front of Shibuya Station in Japan.

Statue of Hachi 
After watching this film, I have been recommending to everyone I met. and I want to continue to do so.

Note: Above article is based on Film "Hachi: The Dog's tale" and views are completely out of author's mad mind.

Source of info: http://www.imdb.com





Saturday, 12 September 2015

Man From The Earth (2007).. Film of 14000 years of journey..

Film: Man from The Earth
Release Date: November 13, 2007
Running time: 89 minutes
Produced by: Emerson Bixby, Eric D. Wilkinson, Richard Schenkman
Directed by: Richard Schenkman
Starring: David Lee Smith, John Billingsley, Tony Todd
IMDB Ratings: 8/10
My ratings: 4.7/5

My Views:

Today, I am going to introduce you, one of my all time favourite movie...

Yeah.. I know we all are from the Earth... But this Hero of this film admits being witnessed a growth and development of Human race.. by living 14000 years on THE EARTH...


You need to imagine a movie, with only one location throughout. Only 07 characters. Discussing and revealing life's secret of one of them. In a room with very low light and no any lust. Everyone will think these are not the ingredients of "One of the favourites of all times."

Off course Not.

Until, it's written by Jerome Biskby, Directed by Richard Schenkman and played by 7 Brilliant actors.

Film released in 2007, Story starts with goodbye party for Professor John Oldman, hardly in mid thirties, Who is retiring early from teaching profession. Six professors and Girl student joins the party. All six professors are highly knowledgeable in there respective fields. And all of sudden professor John Oldman put forward a theory, that he is working on some book and why won't they discuss a topic, considering He has voyaged his life on the earth for about 14000 years after he stopped aging at certain age.

Bingo..

All fellow professors engage deeply in this mysterious and ever new theory or story. They start interrogating him with based on various Scientific, Historical, Social scenarios trying to prove that this theory is wrong. And simultaneously Prof. Oldman reveals his great life by answering their questions and points.

The discussion gets heated, but no one gets to succeed in proving his life as the wrong theory. He also reveals that he had lived in greatest histories of Human being. And the biggest revelation opens, when he admits he had been one of the greatest Person in history (I won't spoil the mystery by telling who he was.) That point takes the discussion to the peak of story pulling viewers along with it.


Is this just a game of wits?  Is he pulling a prank?  Has a lost his mind?  Is he telling the truth?

Just watch the movie for Breathtaking End.

Cinematography is simple, but incredible. As, discussion between characters goes to next level, light changes from evening to dark. One of them lights fireplace and discussion heats up along with heat of Fire place. All of the actors have played their part with devotion. I haven't seen their roles in other movies. Even actor, David Smith Lee who has played role of Prof. Oldman is not so popular either.

But you know, for creating something great, U need not use Extra ordinary or difficult things. U just need to creatively use simple things.

Note: This was the last screenplay written by Jerome Biskby before his death. He just took from The Earth, after being Godfather of "The Man From The Earth".

My suggestion is to just watch before u Die..

Thanks a lot for reading this.